बारामती : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात तिसऱ्या टप्प्याचं लवकरच मतदान पार पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. अशातच बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सणसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सभेत बोलत आहेत. यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत अजित पवार बोलत आहेत.
“सोलापूर हायवे लगतच्या अनेक गावांचा प्रश्न प्रामुख्याने ग्रामस्थांनी सांगितला आहे. बारामती एग्रोमार्फत पुढील हंगामात ऊस घालण्याबाबत दम दिला जात असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितल आहे. ऊस न घालण्याचं कारणही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या, असं शेतकरी म्हणत आहेत. काही घाबरु नका, कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या ऊस न्यायला, अन् भाव पण चांगला देईल”, असं म्हणत अजित पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा…“काय वाटेल ती किंमत देऊ, पण या देशात आम्ही..,”मोदींच्या विरोधात शरद पवारांनी दंड थोपाटले
दरम्यान, अजित पवारांनी सणसरमध्ये शेतकऱ्यांना आश्वासनं दिली. तसेच विरोधकांवर टीका देखील केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंविरोधात धनशक्तीचा वापर, व्हिडीओ पाहा,” रोहित पवारांचा मोठा दावा
हेही वाचा…“महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरीही…” तटकरेंची सभा रामदास आठवलेंनी गाजवली
हेही वाचा….“पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर”, मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केला विश्वास
हेही वाचा..‘अनंत गीते हिरवा साप, विद्वेष अन् वेगळी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न “, तटकरेंचा घणाघात