मुंबई : आपल्याकडे ब्रँड शोधण्याची गरज नाही आहे. आपल्याकडे ब्रँड आहे. फक्त आपल्याला त्या ब्रँडचा वापर करायचा आहे आणि फिरत राहायचे आहे. कारण २०२४ हे इलेक्शनचा काळ आहे. आपल्याकडे राज्य आणि केंद्र शासन जे आहे. त्यांच्याबद्दल अनेक मुद्दे आपल्याकडे आहेत. पण आपण ते बोलत नाही जर आपण ते बोलायला सुरू केलं तर खरोखर प्रभावी आपण होऊ शकतो. असं म्हणत खासदार फौजिया खान यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. अहमदनगर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.
हेही वाचा…“तुम्ही लाख गाड्या द्याल, पण स्वाभिमानी माणूस फक्त शरद पवारच देऊ शकतात”, अजित पवारांवर जोरदार घणाघात
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, कलर ब्लाइंड नेस हा आजार सरकारला झाला तर काय होईल ? सरकारला एकच किंवा दोनच रंग दिसू लागले. तर समाजामध्ये न्याय कुठे राहणार आहे. न्यायच नसेल तर तो समाजच कुठे राहणार आहे. समाजामध्ये न्यायाची कुठे ना कुठेतरी कमतरता आहे. आपल्याकडे सर्वात मोठा प्रश्न हा बेरोजगारीचा आहे. परंतु शासनाने आपल्यावर एक प्रकारचे असे रंग दाखवले आहेत की सर्व सुरळीत चालू आहे परंतु आपण त्यात न फसता आपल्या न्याय हक्कांसाठी लढले पाहिजे. आपले ब्रँड जे पवार साहेब आहेत त्यांनी त्यांच्या काळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत. समाजाच्या प्रवाहासोबत त्यांना लागणाऱ्या गोष्टींकडे साहेबांनी गांभीर्याने दखल घेऊन निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांना साथ देणे गरजेचे आहे. असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
हेही वाचा…“महाराष्ट्राचा सत्यानाश करणाऱ्यांनो..,राज्याची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही”
दरम्यान, आपल्या विभागामध्ये असणाऱ्या सामाजिक न्याय विभागातील ५९ जातींना एकत्रित गोळा करण्याचे काम आगामी काळामध्ये आपल्याला करायला पाहिजे. आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत त्याची सुरुवात आम्ही सातारा येथे केलेली आहे. दोन हजार मातंग समाज बांधवांच्या उपस्थितीत झालेली मातंग परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या सर्व ५९ जातींच्या परिषदा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्याचा सामाजिक न्याय विभागाचे मानस आहे. महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर जे काही अन्याय व अत्याचार चालू आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून तुम्ही त्यांचे वकील बना, त्यांचे प्रवक्ते व्हा व त्यांचे आशीर्वाद घ्या. सामाजिक न्याय विभागाची संघटना बांधणी करत असताना अत्यंत बळकटीने हा विषय आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. मोदी आणि शहा या देशाचे मालक नाहीत. संघाचे व भाजपाचे लोक तुमच्याकडे येतील व तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतील, त्याला बळी पडण्याचे कारण नाही. असं शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख पंडित कांबळे यांनी जिल्हाध्यक्षांना विनंती केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार मा. डॉ. फौजिया खान
आपल्याकडे ब्रँड शोधण्याची गरज नाही आहे आपल्याकडे ब्रँड आहे फक्त आपल्याला त्या ब्रँडचा वापर करायचा आहे आणि फिरत राहायचे आहे कारण २०२४ हे इलेक्शनचा काळ आहे. आपल्याकडे राज्य आणि केंद्र शासन जे आहे त्यांच्याबद्दल अनेक मुद्दे… pic.twitter.com/JkWSGRmosO
— NCP (@NCPspeaks) January 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“22 जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मास बंदी करा,” भाजपच्या ‘या’ आमदाराने केली मागणी
हेही वाचा…“सहकार बुडवणारे सरकार, सरकारच्या महाराष्ट्रद्रोही कृतीचा तीव्र निषेध”, राज्यातील विरोधक आक्रमक
हेही वाचा..“यांच्या बोलण्यात वागण्यात कशातच राम उरलेला नाही”, भाजपाची ठाकरे पिता-पुत्रावर जहरी टिका
हेही वाचा.पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला करणार उपवास, सरयु नदीतही मोदी स्नान करणार
हेही वाचा..“सरकारमध्ये जरा संवेदना असतील तर.. नाही तर.. ” उद्धव ठाकरेंचा आझाद मैदानावरून सरकारवर हल्लाबोल