मुंबई : जरांगे पाटलांना मराठा आरक्षणावर प्रश्न केले. परंतु त्यांनी माझ्यावर विनयभंगाचा आरोप केला. माझ्यावर जे आरोप झाले. त्याच्या चौकशीसाठी तयार आहे. माझ्यावर नार्को, ब्रेन, मॅपिंग, लाय डिटेक्टर टेस्टसाठी तयार आहे. परंतु तुझे ज्यावेळी काळे धंदे बाहेर पडतील. त्यावेळी मराठा समाज तुला दगड मारतील. असा इशारा आज अजय महाराज यांनी मनोज जरांगे पाटलांना दिला.
हेही वाचा…“ते काय हळदीकुंकू आहे का, भांडण झालं म्हणून जायचं नाही ?”सुळेंवर टिका करणाऱ्या चाकणकरांची हवाच काढली
अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघतांना जरांगे पाटलांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र लोणावळ्यात बंद दाराआड बैठक झाली. त्यानंतर वाशीत गेल्यानंतर त्यांना आता काय झालं की, त्यांनी सरसकट मागणी बदलून सगेसोयऱ्यांची मागणी केली. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला फसवलं आहे. असा आरोप देखील त्यांनी लावला.
हेही वाचा…“तुतारी एका संघर्षाची सुरूवात करण्याची प्रेरणा”, शरद पवारांनी रायगडावरून शड्डू ठोकला
मनोज जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला करण्यात आला. असा आरोप देखील अजय महाराज यांनी केला आहे. तसेच भंगार लोकांना मी उत्तर देणार नाही. त्यांची उत्तर द्यायला मी मोकळा नाही. तसेच जरांगे पाटलांनी तुकोबांवरील वक्तव्यावरून माफी मागितली ती अहंकारातून आली. माफी मागणाऱ्या माहिती आहे का माफी मागितली. असा पलटवार देखील त्यांनी केला. यातच अजय महाराज हा सरकारचा एजेंट आहे. त्यांनी यासाठी पैसे घेतले असा आरोप देखील जरांगे पाटलांनी केला. त्यावर माझ्यावर ३०० कोटींची संपत्तीचे आरोप केले, मग ४० लाख का घेऊ. ? असा सवाल करत जरांगे बेताल आणि बेछूट झाले आहेत. असाही हल्लाबोल त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगे पाटलांनी मराठा समाजाला फसवलं, अजय महाराजांचा पुन्हा जोरदार घणाघात, पुराव्यासगट सगळचं दाखवलं
हेही वाचा…वंचितचा ३९ कमली अजेंडा आघाडीने स्विकारला, आता जागावाटप बाकी, किती जागा मिळणार ?
हेही वाचा…“तुतारी चिन्हांचं रायगडावर अनावरण,” भाजपला चांगल्याच मिरच्या झोंबल्या, म्हणाले…
हेही वाचा...तुतारी वाजवण्याचं मिटकरींचं चॅलेंज आव्हाडांकडून पुर्ण, एक लाखाचं चेक तयार पण…
हेही वाचा…“नांदेडमध्ये ‘कॉंग्रेसचा बुरूज’ ढासळला,” अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश