मुंबई : शिवसेनेत पक्ष फुट झाल्यानंतर आता पर्यंत जवळपास २०१७ साली निवडून आलेले ३५ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यातच आणखी मुंबईतील माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिंदेंची ताकद वाढली आहे. तर दिवसेंदिवस ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करतांना दिसत आहेत.
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
मुंबईतील चांदीवली विभागाचे माजी नगरसेविका लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह काॅंग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष माया खोत आणि उपाध्यक्ष जया नाडर यांच्यासह असंख्य पदाधिकांऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस मुंबईत वाढत असून २०१७ साली निवडून आलेले ३५ नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले असल्याचं शिंदेंनी याेळी सांगितलं आहे.
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
दरम्यान, राज्यात त्रिशूळ सरकारमध्ये राज्याचा विकास झपाट्याने होत आहे. आपल्याला अपेक्षित असलेला विकास नक्की होईल. असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी आमदार दिपीप लांडे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदी उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, सगळ्यांनी पुन्हा मिळून एक व्हा”, आव्हाडांनी कुणाला केलं आवाहन ?
हेही वाचा…“घाटी रुग्णालयात मृ’त्यू’चा थैमान..! किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे ?
हेही वाचा…ठाकरेंच्या शिलेदाराकडून फडणवीसांचा ‘फडतूस’ उल्लेख, भाजपकडून जोरदार प्रहार होणार ?
हेही वाचा…“संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले, तेव्हाच राऊतांसारखी त्यांची वक्तव्ये”, शिंदे गटाने डिवचलं
हेही वाचा…काॅंग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता भाजपही जातनिहाय जनगणनेसाठी आग्रही, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष