नागुपर : कृषी उत्तप्न् बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाशी हातमिळवणी केल्याप्रकरणानंतर काॅंग्रेसचे दोन नेते एकमेकांत भिडल्याचं चित्र बघायला मिळाले. काॅंग्रेसचे चंद्रपुर जिल्ह्याध्यक्ष प्रकाश देवतळे यांना कार्यमुक्त करण्यात आल्याने माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान दिले. त्यानंतर त्यांना उत्तर देण्यात ते मोठे नेते नाहीत. असं म्हणत नाना पटोले यांनी वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा…“ज्यांना १७ दारं फिरूनही कुत्र विचारत नाही, त्यांनी नैतिकता शिकवू नये,” दानवेंचा राणेंना जोरदार प्रत्युत्तर
देवतळे हे वडेट्टीवार यांचे समर्थक आहे आणि त्यांनी भाजपाशी हातमिळवणी त्यांच्या सहमतीने केली हे उघड आहे. आपल्या समर्थकांची अशाप्रकारे हकालपट्टी करण्यात आल्याने वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नाहीत. आपापसांत ताळमेळ करून त्या लढविल्या जातात. कारवाई करायची झाल्यास सर्वांवर कारवाई करावी लागेल. सहकार क्षेत्रांत कारवाई करत असताना ती विचार करून केली पाहिजे. असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
हेही वाचा…100 कोटी वसुली प्रकरण..! शिंदे सरकारचा ‘परमबीर सिंह’ ला मोठा दिलासा, आघाडीचा तो निर्णय मागे
पुढे ते म्हणाले की, एवढेच नव्हेतर राज्यात २२ ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाशी युत्या करण्यात आली. मग त्यांच्यावरही कारवाई करण्यात यायला हवी. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच वडेट्टीवार एवढे ते मोठे नेते नाहीत की त्यांच्यावर मी बोलले पाहिजे. असा टोला त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे, आघाडीच्या काळातील ‘दोन’ प्रकरणात आज मोठी घडामोड
हेही वाचा…“तर शरद पवार पंतप्रधान झाले असते, आजही परिस्थिती बदलली तर ते होऊ शकतात, “
हेही वाचा…१०० कोटी प्रकरणातील परमबीर सिंहंचं निलंबन मागे घेण्याचं फडणवीसांनी सांगितलं कारण
हेही वाचा…“..तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही अडचणीत येऊ शकतो,” संजय राऊतांच्या वक्तव्याने एकच चर्चा*
हेही वाचा…“…तर मोदींनी हे करावे, म्हणजे ईडीचा वेळ अन् देशाचा खर्च वाचेल”