मुंबई : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विरोधी पक्षनेते पदी घोषणा करण्यात आली. त्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर राज्यातील अनेक नेत्यांनी सभागृहात जोरदार भाषणं केलीत. यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांनी आपलं भाषण करतांना अनेकांना खोपरखळ्या मारल्या तर त्यांनी राज्य सत्तेबाबत महत्वपुर्ण भाष्य केलं.
हेही वाचा…अखेर.., राज्याला मिळाला विरोधी पक्षनेता, काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या गळ्यात पडली माळ
२०१९ साली विजूभाऊ विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीला सत्ता मिळवून दिली. आज पुन्हा त्यांचे विरोधी पक्षनेते होणे हा शुभ संदेश आहे. मला विश्वास आहे की ते या पदाला योग्य न्याय देतील, आपल्या राज्यात गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडतील. असं म्हणत जयंत पाटलांनी राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल. असं अप्रत्यक्षपणे म्हटलं. याआधी विजय वडेट्टीवार यांनी २०१९ साली विरोधी पक्षनेते पद भुषवलं होतं. त्यानंतर लगेचच महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं.
हेही वाचा…“शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा, पण..,” सामानातून जोरदार टिका
विजय वडेट्टीवार हे विदर्भातील झुंजार आणि लढावू नेतृत्व आहे. सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर त्यांनी विरोधी पक्षाचे आमदार म्हणूनही आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. अशा कठीण प्रसंगात एक आक्रमक व्यक्ती त्या पदावर बसणे आवश्यक होते. मला वाटतं या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड झाली आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा आगडोंब उसळला आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत मोठा बदल घडत आहे. अशा परिस्थितीत विजयभाऊ विरोधी पक्षनेते पदाला योग्य न्याय देतील, असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.
हेही वाचा…“भिडे हे भाजपच्या कार्यकारी समितीत नाही किंवा आमचे कार्यकर्तेही नाही”, चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, याआधी अनेक विरोधी पक्षनेते होऊन गेले ज्यांनी या खुर्चीला न्याय दिला आणि आपले संबंध कायम ठेवले. नारायण राणे साहेब विरोधी पक्षनेते असताना त्यांचा प्रचंड दरारा होता. प्रत्येक विषयात त्यांचा चांगला अभ्यास असे, मी अर्थमंत्री असताना अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अर्थसंकल्पाविरोधात जोरदार भाषण करत. त्यांची मांडणी प्रचंड प्रभावी असायची. खडसे साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांचाही स्वभाव तसाच होता. विरोधी पक्षात आणि सत्ताधारी पक्षात नेहमीच सौहार्द राहिले आहे ही आजपर्यंतची प्रथा आहे. हे सभागृह खेळीमेळीने चालायला हवे. सभागृहात मुंडे साहेब माझ्या विरोधात जोरदार भाषण करत आणि चहासाठी माझ्याच दालनात यायचे. विरोध हा फक्त त्या विषयापूर्ता मर्यादित असायला पाहिजे. मला विश्वास आहे की या सभागृहात ते पाळले जाईल.
READ ALSO :
हेही वाचा…‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर ! ‘महाविजय २०२४’चे लोकसभा समन्वयकपद आणि ‘हर घर तिरंगा’ची जबाबदारी
हेही वाचा…विजय वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेते पद, नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा धोका वाढला”
हेही वाचा…कोर्टातली सुनावणी लांबणीवर, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले ‘तीन’ आदेश
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना झटका..! पक्षचिन्ह, शिवसेना नाव याचिकेवरील तातडीच्या सुनावणीवर SC चा नकार
हेही वाचा…ना थोरात ना पटोले विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय!