मुंबई : शिवसेनेचा आज मुंबई महानगरपालिकेवर पुर्ण ताकतीने मोर्चा निघणार आहे. जेव्हापासून महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आली आहे. नगरसेवक, लोकप्रतिनिधींना येऊ दिलं जात नाही. हे संपुर्ण प्रशासनाच्या माध्यमातून मंत्रालय आणि सध्याच्या वर्षा बंगला लुट सुरू आहे. महानगरपालिकेची या मोर्चाचे नेतृत्व युवा सेना प्रमुख शिवसेनेचे तरूण नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे. आज शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा निघणार आहे.
हेही वाचा…नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रीपद जाणार, दिल्लीत झाला शिक्कामोर्तब
शिवसेनेच्या धडक मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला आघाडी उपस्थित राहणार आहेत. या मोर्चात अडथळे यावे यासाठी अनेक कारस्थान करण्यात येत आहे. तही हा मोर्चा निघत आहे. असंही राऊतांनी म्हटलं आहे. तर त्यावर कोविडमध्ये बॉडीबॅगमध्ये कटकमिशन, औषध, चादरी, पंखे प्रत्येक गोष्टीत खाल्लेत.. एवढंच नाही.. कचरा खाल्लात, नाल्यातील गाळ खाल्लात.. पालिकेची तर 25 वर्षांत आख्खी तिजोरी खाल्लीत? उबाठा गटाच्या खादाडांनो तुम्ही तर भस्म्या झालेले ढोर..! बघा मुंबईकर हो उद्या मुंबईत.. चोर मचाए शोर!! असं म्हणत भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…“विरोधकांची पाटण्याची बैठक ही राहुल गांधींच्या लग्नाची सोयरीक जुळवण्यासाठी होती”, रावसाहेव दानवेंची फटकेबाजी
त्यावर राऊतांनी देखील पलटवार केला आहे. भाजप नौटंकी करीत आहे. मुंबईतील भाजप यांना कोणती दिशा नाही. हिम्मंत असेल तर निवडणुका घ्या, ना म्हणजे शोर कोण वाजवते आणि चोर कोण हे जनता दाखवतील. निवडणुका घेण्याच्या नाही, लोकांच्या सामोरं जायचं नाही आणि अशा नौटंकी करायच्या म्हणून आमचा मोर्चा पाहून जे आमचे राजकीय विरोधक आहे, सत्ताधारी त्यांच्या डोळ्यातील बुबळे बाहेर येतील असंही राऊतांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, शरद पवारांकडून वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित
हेही वाचा…“पंकजा ताई स्वत: च्याच स्वार्थी राजकारणासाठी…..,”मराठा समाजाने पंकजा मुंडेंवर केली पहिल्यांदाच टिका
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा, राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत
हेही वाचा…“साहेबांचं राहिलं स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी आपली, ” विनायक मेटेंच्या पत्नीची फडणवीसांसमोरच मागणी
हेही वाचा…“थोडी तरी माणसात क्रेडिबिलिटी असली पाहिजे”, वरूण सरदेसाईंनी नितेश राणेंना दाखवला बाहेरचा रस्ता