मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अनेक दिवसांनी पहिल्या टप्प्यात 20 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र शिंदे सरकारमधील मंत्रिपदाच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार अद्यापही झाला नाही. यातच आता एकनाथ शिंदें मंत्रिमंडळाचं पहिलचं राज्याचं हिवाळी अधिवेशन होऊ घातलं आहे. त्या आधी दुसऱ्या टप्प्याचा विस्तार होणार का ? याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
“महाराजांवर दुसरं कोणी बोललं असतं तर भाजपने थयथयाट केला असता”; संजय राऊत
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, योग्य वेळी, योग्य क्षणी मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. विस्तार झाला नसला तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जनहिताचे, धोरणात्मक निर्णय घेत असतात. केंद्रीय नेततृत्वाशी समन्वय साधून मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल असंही ते म्हणाले.
चॅनेलमधील मुली पत्रकार साडी का घालत नाहीत..? सुप्रिया सुळेंचा अजब सवाल
तसेच राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार डिसेंबरमध्ये नागपुर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापुर्वी करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी हा विस्तार लांबणीवर पडणार असल्याची चर्चा भाजप आणि शिंदे गटात सुरू आहे.
Read also
- “राज्यपालांचं आक्षेपार्ह वक्तव्य हे दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर”
- अन् राष्ट्रवादीने डुल्पिकेट राज्यापालांचं धोतर फाडलं..! महाराजांबाबतच्या वादग्रस्त वकव्यानंतर तीव्र संताप
- “पाठराखण का करताहेत, कोश्यारींना तात्काळ महाराष्ट्राबाहेर काढा”; संभाजी राजे फडणवीसांवर संतापले
- “शरीराचा भाग जसा कापून काढतो तसा त्रिवेदी अन् राज्यपालांना..”; उदयनराजे संतापले
- ‘टिकली’ वर टिका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का ? चित्रा वाघ यांचा सवाल