मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये 40 वर्ष काढली आहेत. त्यामुळे भाजपचे चार ते पाच मत नाथाभाऊंना 100 टक्के असणार आहेत. असं वक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. विधान परिषद निवडणुकीकरीता त्यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की मी म्हणजे पक्ष. त्यांचे इतर नेते देखील देवेंद्र फडणवीस यांचं वारंवार उल्लेख करतात. परंतु पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी डावल्यानंतर भाजपचे इतर आमदार त्यांच्यावर नाराज आहेत. ते नाराज आमदार नाथाभाऊंनासोबत प्रामाणिक आहेत. त्याचा फटका भाजपचा 100 टक्के बसणार आहे. पंकजा मुंडे यांचा झालेला अपमान आणि नाथाभाऊंची झालेली गळचेपी यांचा व्याजासह परतफेड सांयकाळच्या निकालामधून दिसणार आहे. असंही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
JNU मध्ये 12 वर्षे शिक्षण घेऊनही तुला कोणी मुलगी का दिली नाही? अग्निपथ योजनेवरून भाजपचा सवाल
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने काही आमदारांवर दवाब निर्माण केला होता. परंतु आता या दबावाला आमदार बळी पडणार नाहीत. त्यामुळे भाजपचा जो काही मस्ती आणि माज आहे, जो आज उतरलेला दिसणार आहे. असा इशारा देखील अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
“विधान परिषदेच्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांची जादू चालणार”; रामदास आठवले
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या 105 आमदार तर काॅंग्रेसच्या 35 आमदारांनी मतदान केलं आहे. अजूनही 9 आमदारांचं मतदान अजून बाकी आहेत. भाजपकडून देखील लक्ष्मण जगताप यांचं मतदान बाकी आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पाच आमदारांचं मतदान बाकी आहे. यामध्ये जयंत पाटील अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि मोहिते पाटील यांचं मतदान बाकी आहेत. बारापर्यंत 203 आमदारांचं मतदान झालं आहे.
Read also:
- “उमेदवार निवडून आल्यास संजय राऊत काय बोलणार ते आता मी पाहणार”; देवेंद्र भुयार
- “मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा”; भाजपच्या नेत्याचं सुचक वक्तव्य
- “मी पुन्हा येईन”, रोहित पवारांनी काढली फडणवीसांची जुनी आठवण
- “गद्दारी करून सत्तेत आलेल्या सरकारला आमदार योग्य उत्तर देणार”
- “भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी काॅंग्रेसला सहयोग करा”; अग्निपथ योजनेवरून पटोलेंचं तरूणांना आवाहन