नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली झालेल्या हिंसेला थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून, त्यांना एक क्षण देखील पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याविरोधातील ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनकर्त्यांनी थेट लाल किल्यावर चढून ध्वज फडकवला होता. या हिंसाचारात अनेक पोलीस देखील जखमी झाले होते. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
किसान आंदोलन की आड़ में हुई हिंसा के लिए सीधे-सीधे गृह मंत्री अमित शाह ज़िम्मेदारी हैं। उन्हें एक पल भी अपने पद पर बने रहने का अधिकार नहीं, उन्हें बर्खास्त किया जाना चाहिए। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की ये मांग है: रणदीप सिंह सुरजेवाला, कांग्रेस pic.twitter.com/t41DiwjX2F
— ANI_HindiNews (@AHindinews) January 27, 2021
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी हिंसाचारासाठी अमित शहांनी जबाबदार धरत त्यांना बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
सुरजेवाला म्हणाले की, अमित शहा यांच्या आदेशावरुनच दिल्ली पोलिसांकडून शेतकरी आंदोलनातील शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करत आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृतीतून भाजपा सरकारचाच हा डाव असल्याचे सिद्ध होते.
अमित शहा यांना एक क्षणही आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तात्काळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.
Read Also :
- ‘बेळगाव सोडा, मुंबईवर सुद्धा आमचाच हक्क’, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचे अजब वक्तव्य
- ‘देवेंद्रभाऊ, ज्या मेट्रोतून तुम्ही प्रवास केला त्याची सुरुवात काँग्रेसने केली’, सत्यजित तांबेंचा फडणवीसांना टोला
- ‘ती’ 2 नावे घेताना काहींना अॅलर्जी होते, शरद पवारांचा विखे पाटलांवर निशाणा
- ‘काँग्रेसने शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवले’, केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप
- ‘महाविकास आघाडीचा गोंधळ पाहता…’, दिल्ली मेट्रोत बसून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा