अमळनेर : शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नव्या कायदा अमलात आणेल , अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. तसेच महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याप्रमाणे कायदा अधिवेशनात मंजूर करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
वरणगाव येथे एसआरपीएफ बटालियन सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले .अमळनेर येथील पोलीस वसाहतीचे उद्घाटन व एरंडोल पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील होते. गृहमंत्री देशमुख यांनी शेतकऱ्यांविषयी न्याय देण्याची मोहीम राबवल्याबद्दल आणि कायद्याची मागणी करणाऱ्या प्रतापराव दिघावकर यांचे अभिनंदन केले.
Read Also :
बेळगावसह सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात: मंत्री एकनाथ शिंदे
तुझ्याशी माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, हे सरकार आहे की सर्कस हेच कळेनासं झालंय…
घर बांधणीचा निर्णय ग्रामपंचायतींकडे , ठाकरे सरकारने निर्णय बदलला