तीन पक्षात अतिशय समन्वय आहे. आम्ही एकमेकांची कामे करत आहोत. काही लोक स्ततःचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी आरोप करत आहेत. ठाकरे सरकारला टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे विरोधकांना ठाकरे नावाची अॅलर्जी असल्याने ते टीका करत असल्याचे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे .
केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी राज्यात लवकर तज्ज्ञांती कृती समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. धोरणातील विविध तरतुदींची अंमलबजावणी व बदल करण्याबाबत पुढील एक-दोन महिन्यात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोकणसह अन्य नवीन विद्यापीठांच्या निर्मिती निर्मितीऐवजी सध्या विद्यापीठांचे विकेंद्रीकरणावर भर दिला जाणार आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठ करण्यास तेथील अनेकांचा नकार आहे. त्यामुळे विद्यापीठांची उपकेंद्र चांगल्याप्रकारे विकसित केली जातील. त्याअनुषंगाने शैक्षणिक धोरणाचाही आधार घेतला जाईल. तज्ज्ञ समिती त्यावर अभ्यास करेल, असे सामंत यांनी नमुद केले.
दरम्यान , उदय सामंत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वाबाबतही यावेळी भाष्य केलं. तीन पक्षात अतिशय समन्वय आहे. आम्ही एकमेकांची कामे करत आहोत. काही लोक स्ततःचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी आरोप करत आहेत. ठाकरे सरकारला टार्गेट केलं जात आहे. मात्र महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे आहे, असे सामंत यांनी विरोधकांना उत्तर दिले. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी निवड करणे योग्य आहे. आदित्य ठाकरे यांच्यात कुवत आहे. ज्यांना ठाकरेंची अलर्जी आहे त्यांचाच विरोध आहे, असे ते म्हणाले.