गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले. यावेळी त्यांनी,“कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे; जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. आयसीएमआरच्या संशोधनामध्ये कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा प्लाझ्मा उपचारासाठी लाभदायक ठरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे डॉ.आव्हाड यांनी ब्लडलाईन रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मा दान केले. यावेळी कोरोनावर मात केलेले शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील डॉ.आव्हाड यांच्यासोबत प्लाझ्मादान केले.
जर कोरोनातून मुक्त झालेल्या प्रत्येक माणसाने प्लाझ्मा दान केला तर, महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच आपण हे दान केले आहे. इतरांनीही हे दान करावे. असे आवाहन आव्हाड यांनी केला आहे.
गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांचे वाढदिवसानिमित्त प्लाझ्मा दान.. https://t.co/4JQxzw2HcI
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 5, 2020