मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तीन वेळा सर्जिकल ट्राईक झाले होते या गोष्टीचे कधी भांडवल केले नाही. सैन्याने सर्जिकल ट्राईकची कामगिरी केली परंतू त्याचे श्रेय मात्र मोदींनी स्वतः घेतले असे करणे योग्य आहे काय असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला विचारला उदयपूर मध्ये व्यापाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते.
खाजगी शिक्षण संस्था चांगल्या सुविधांनी युक्त असतात तर सरकारी शिक्षण संस्था बिमारू असतात असा खोचक वार करून राहुल गांधी यांनी शिक्षण आणि आरोग्य सरकारची दायित्वाची बाब असल्याचे नमूद केले. राहुल गांधी यांनी पहिल्या पासूनच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर भाष्य केले असून त्यांच्या विकासाच्या भूमिकेतील शिक्षण आणि आरोग्य हे महत्वाचे पैलू आहेत.
मनमोहन सिंग यांच्या कडे सैन्य अधिकारी सर्जिकल ट्राईक बद्दल बोलायला गेले तेव्हा सैन्य अधिकाऱ्यांनी सर्जिकल ट्राईक बद्दल गोफणीयता बाळगण्याची विनंती सिंग यांना केली म्हणून मनमोहन सिंग यांनी त्याबद्दल कोठेही वाच्यता केली नाही. परंतु आपले पंतप्रधान या बद्दल जाहीर वक्तव्य करत सुटले आहेत असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल ट्राईक घडवून आणले असा अजब युक्तिवाद राहुल गांधी यांनी या सभेत सादर केला आहे . राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सूरु असून नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात चांगलाच कलंगी तुरा रंगला असल्याचे सध्या बघायला मिळते आहे. भाजपच्या ताब्यात असलेली विधानसभा आपल्या ताब्यात आणून राजस्थानात सत्ता स्थापन करण्याचा चंग काँग्रेसने बांधले आहेत.