पोलिस दंड करतील म्हणून ‘या’ व्यक्तीनं केलं असं काही की पोलिस झाले ‘हैराण-परेशान’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहे, आणि हे नियम मोडणाऱ्यांना भरमसाठ दंड सोसावा लागत आहे. अनेकदा गाडीच्या किंमतीपेक्षा अधिक दंड भरावा लागल्याच्या घटना आहे. त्यामुळे वाहन चालक वैतागले आहेत. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात धास्तावले असून या खिसेकापू दंडामुळे धास्तावले असून नागरिक या दंडापासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगत आहे.
Telangana: Case registered against a person by Jeedimetla police for driving a car with 'AP CM JAGAN' written on it, in place of the vehicle's registration number. #Hyderabad pic.twitter.com/kSw40Szwsu
— ANI (@ANI) October 22, 2019
एका व्यक्तीने मात्र या दंडापासून वाचण्यासाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने आपल्या गाडीची नंबरप्लेट बसवली असून याचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आमदारांच्या नावाच्या स्टिकरचा देखील काहीजण या दंडापासून वाचण्यासाठी वापर करताना दिसून येत आहेत.
या व्यक्तीने गाडीच्या नंबर प्लेटवर ‘एपी सीएम जगन’ असे लिहिले होते. इतकेच नाही तर कारच्या दोन्ही नंबर प्लेटवर हे नाव लिहलेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑक्टोबर रोजी नियमितपणे वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी एका वाहनाला अडवले. या गाडीचा मालक एम हरि राकेश असून तो गोदावरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यावेळी त्याने दंडापासून वाचण्यासाठी असे केल्याचे पोलिसांना सांगितले.
गाडी जप्त केली
या प्रकरणामुळे पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली असून त्याच्याविरुद्यज कलम 420 आणि 210 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे आता त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Visit : Policenama.com
- पुरुषांनी मसल्स मजबूत करण्यासाठी प्यावे ‘हे’ दूध, होतील १० फायदे ! –
- ‘परफेक्ट फिगर’साठी जिममध्ये जाताय ? पण लक्षात ठेवा, करू नका ‘या’ चुका –
- जिममध्ये न जाताही बनवू शकता पिळदार शरीर, जाणून घ्या हे खास उपाय ! –
- गरोदरपणात कोणती योगासने करावीत, जाणून घ्या ५ आसने –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- डाएटसाठी कृत्रिम ‘स्वीटनर’चा वापर आरोग्यासाठी ठरू शकतो धोकादायक ! –
- शरीरयष्टी किरकोळ आहे का ? ‘या’ पदार्थांच्या वापराने वाढू शकते वजन –
- नाष्ट्यात ‘हा’ पदार्थ आवश्य खा, कारण हा आहे अतिशय आरोग्यदायी आहार –
- सुंदर दिसण्यासाठी पायाच्या तळव्यांची अशी घ्या काळजी, जाणून घ्या –