याप्रकरणी वारंवार आदेश देऊनही गडाख यांच्यासह काही आंदोलक न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित राहत नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात येऊन अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते. यानंतर गडाख यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी सोनई, शनिशिंगणापूर, नगर परिसरात शोध घेतला होता. न्यायालयाने गडाख यांना 31 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याची शेवटची संधी दिली होती.
जामीन मिळाल्यावर माध्यमांशी बोलताना गडाख म्हणाले की, 4 महिन्यापूर्वी मला वॉरंट निघाले होते. परंतु अतिशय नियोजनपूर्वक लोकप्रतिनिधींनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून वॉरंट आपल्यापर्यंत पोहचू दिले नसल्याचा गंभीर आरोप केला. पोलिसांनी मी नगरच्या निवासस्थानी नसताना घराची झाडाझडती घेतली. कायद्याचा आदर करून रीतसर जामीन घेतला आहे. ज्या ज्या वेळेस पाटपाणी प्रश्न असो की शेतकरी अडचणीत येईल, त्यावेळेस शांत न बसता आंदोलन करण्याचा निर्धार शंकरराव गडाख यांनी बोलून दाखविला.
आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी