आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज (बुधवारी) मुंबई महापालिका मुख्यालयात कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कोरोनाशी संबंधित माहिती दिली. त्यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. पण, तरीही काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असले तरी काळजी घेणे आवश्यक असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मास्कचा वापर करणे, अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. (Corona in Maharashtra)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘शाळा, कॉलेजसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालक अथवा डॉक्टरांनी अद्याप कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे याबाबत निर्णय आणखी 2 दिवसांनी घेतला जाणार असल्याचं ते म्हणाले. एखाद्या इमारतीत 10 पेक्षा जास्त व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास ती संपूर्ण इमारत पुढील 15 दिवस सील केली जाणार असल्याची माहिती देखील आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे.
Web Title :- Corona in Maharashtra | if more 10 people are found be corona positive building will be sealed informed minister aditya thackeray