बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन भाजपाने(BJP ) राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने(BJP ) केला आहे. इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी गोस्वामींना अटक केली, त्यानंतर दुपारी अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केले. याबाबत आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट (ram-kadam-meets-governor) घेतली. या भेटीत कदम म्हणाले की, ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली, त्या 9 पोलिसांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांची चौकशी (demand-police-suspend-arnab-goswami-arrested) करा. पोलिसांबद्दल आदर असला तरी मारहाण योग्य नाही अशी मागणी कदम यांनी राज्यपालांकडे केली आहे.
पत्रकार #अर्नबगोस्वामी को मारपीट करने वाले 9 पोलीस वालो को तुरंत सस्पेंड करके उसकी जाँच की जाये इस माँग के लिए आज सुबह महामहिम राज्यपाल से भेंट की .
पोलीस के प्रती भरती पुरा आदर-सन्मान लेकिन मारपीट मंज़ूर नहीं #ArnabWeAreWithYou #ArnabPrideOfIndia #EmergencyInMaharashtra pic.twitter.com/zjAXOeAsuR— Ram Kadam (@ramkadam) November 5, 2020
दरम्यान याच प्रकरणात आमदार कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पत्रकार अर्णब गोस्वामी यांना वरळी येथील घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करून पोलिसांनी गोस्वामींना मारहाण केली. आम्ही पोलिसांच्या वर्दीचा सन्मान, आदर करतो परंतु ज्या 9 पोलिसांनी अशाप्रकारे पत्रकाराला मारहाण केली, ते देशातील समाज सहन करणार नाही. या 9 पोलिसांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असे त्यांनी म्हटले आहे. पत्रकारितेवर हल्ला करणारे आणि महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेने नेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह देशाची माफी मागितली पाहिजे आणि तात्काळ अर्णब गोस्वामींची सुटका करावी असे ते म्हणाले.
I demand @OfficeofUT & @AnilDeshmukhNCP that Suspension of 9 cops who physically assaulted senior journalist #ArnabGoswami & immediately release him pic.twitter.com/rlTUX7WAeb
— Ram Kadam (@ramkadam) November 4, 2020
गोस्वामींना न्यायालयात हजर केल्यावर काय घडल ?
अर्णब यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला. तेव्हा न्यायधीशांनी अर्णबची वैद्यकीय तपासणीची आदेश दिले. त्यानंतर गोस्वामी न्यायलयात हातवारे, इशारे करताना दिसल्यावर न्यायधीश संतापले, त्यांनी गोस्वामी यांना तुम्ही नीट उभे राहा, हातवारे करू नका असे बजावले. त्यानंतर अर्णब शांत बसून सुनावणी ऐकू लागले. अर्णबला मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी नाकारला. त्यानंतर रिमांड अर्जावर सुनावणीवेळी कोर्टाने 3 निरीक्षणे नोंदवली. पोलिसांनी कोर्टाची परवानगी न मागता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली, कोणताही सबळ पुरावा नसताना अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी का पाहिजे असा सवाल न्यायालयाने केला, तर अन्वय नाईक,आई कुमुद यांचा मृत्यू आणि आरोपींचा काय संबंध याबद्दल रायगड पोलीस न्यायालयाला समजून सांगू शकले नाहीत, पुरावेही देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी केलेली अटक अवैध असल्याचे सांगत न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. याबाबत बीबीसीनं वृत्त दिले आहे.