आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्याच्या दिवसात अनेक हिरव्या रानभाज्या बाजारात येतात. यापैकी एक भाजी म्हणजे करटोली. पावसाळ्यात उगवणारी ही रानभाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. या भाजीला जगातील सर्वात पौष्टिक भाजी मानले जाते.
ही भाजी ककोडे, गोड कारले, केकरोल, भाट कारले , करटोली यांसारख्या नावाने प्रचलित आहे. ही भाजी कारल्याच्या प्रजातीतीतील आहे मात्र ही चवीने कारल्यासारखी कडू नसते. काही ठिकाणी ह्या भाजीला औषध म्हणून वापरले जाते. ह्या भाजीचे नियमित सेवन केल्याने शारीरिक ताकत वाढते असे मानले जाते. हिरवी मध्यम आकाराची बाहेरून बारीक कात्यासारखे उंचवटे असलेल्या या भाजीत भरपूर प्रमाणात फायबर आढळतात.
फायदे
ही भाजी स्वादिष्ट आहेच पण यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. या भाजीतील प्रोटीनपासून मिळणारी ताकद चिकनपेक्षा पाच पट अधिक आहे.
करटोलीमध्ये फायबर आणि अॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ही भाजी पचायला हलकी असते.
पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.
या भाजीमुळे शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी तसेच कॅन्सर, हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.
करटोलीमधले ल्युटेनसारखे कॅरोनाइड्स डोळ्याचे रोग, हृदय रोग तसेच कॅन्सरला प्रतिबंध करतात.
वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला, इतर अॅलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
या भाजीच्या सेवनाने रक्तातील शुगर लेवल कमी होते. त्यामुळे डायबेटिजच्या रुग्णांसाठी ही भाजी खूप लाभदायक मानली जाते.
१०० ग्रॅम करटोल्याचं सेवन केले तर केवळ १७ कॅलरीज तुमच्या शरीरात जातात. त्यामुळे वजन घटवण्यासाठी ही भाजी खाल्ली जाते.